बाळाप्पाचे व सुंदराबाईचे फार वाकडे पडले त्यामुळे बाळाप्पा श्री समर्थांची सेवा सोडून मारुतीच्या देवळात जप करीत असे आणि त्रिकाळ श्री स्वामींच्या दर्शनास येत असे एक वेळ सुंदराबाई म्हणाली महाराज बाळाप्पा आपली सेवा सोडून दूर जाऊन मारुतीच्या देवळात जप करीत असतो तेव्हा महाराज म्हणाले अगं आपले भक्त हजारो कोसावर असले तरी ते आपल्या जवळच आहेत.


अर्थ भावार्थ मथितार्थ 

सुंदराबाई आणि बाळाप्पा हे दोघेही श्री स्वामी समर्थांच्या सेवेत होते येथे या दोघांच्या वृत्ती प्रवृत्ती मनोधारणा आणि आचार विचार पूर्णतः भिन्न आहेत त्यामुळेच त्या दोघात वाकडेपणा आला या वाकडे पणातूनच बाळाप्पा श्री स्वामींची सेवा सोडून मारुतीच्या मंदिरात आला येथे मात्र तो श्री स्वामींची जपाच्या स्वरुपात सेवा करु लागला व नित्य नियमाने श्री स्वामी महाराजांच्या दर्शनास येऊ लागला येथे बाळाप्पा म्हणजे संसार प्रपंचातील निवृत्तीचे प्रतीक आहेतर सुंदराबाई पूर्णतः षडरिपूलिप्ततेची प्रवृत्ती आहे निवृत्ती ही देवाकडे वळते याउलट षडरिपूलिप्त प्रवृत्ती भोगाकडे वळते तिला त्यापुढे साक्षात परमेश्वरही गौण दुय्यम वाटतो दृश्य स्वरुपातील सुखाकडेच तिचा अधिक ओढा असतो या उलट दुसऱ्या टोकाचे आचरण निवृत्तीवाद्याचे असते म्हणून बाळाप्पा आणि सुंदराबाई हे जणू काय दोन ध्रुवावर दोघे आहेत निवृत्तीवादी बाळाप्पाचे षडरिपूलिप्त प्रवृत्तीवादी सुंदराबाईशी भांडण होते अखेरीस तो मारुतीच्या मंदिरात येतो तेथे तो त्याच्या उपास्य दैवताचा म्हणजे श्री स्वामी समर्थांचा जप करतो त्रिकाल त्यांच्या दर्शनासही जातो तो प्रत्यक्ष श्री स्वामींच्या जवळ जरी नसला तरी त्याच्या ह्रदयमंदिरात श्री स्वामी स्थानापन्न झालेले होते या उलट सुंदराबाई दृष्य स्वरुपात जरी श्री स्वामी सेवेत असली तरी तिला श्री स्वामींची फारशी पर्वा वाटत नव्हती कारण ती मोह मायेत आकंठ बुडालेली षडरिपूंनी ग्रस्त होती सुंदराबाई जेव्हा बाळाप्पा दूर जाऊन मारुतीच्या मंदिरात जप करीत असल्याचे सांगते तेव्हा एक प्रकारे ती बाळाप्पाचे उणेपण सांगून त्याच्या विषयी श्री स्वामींकडे तक्रारच करीत असते तेव्हा श्री स्वामींनी दिलेले उत्तर अग आपले भक्त हजारो कोसावर असले तरी ते आपल्याजवळच असतात अत्यंत मनोज्ञ व आपणास विचार करावयास लावणारे हे गुरुवचन आहे त्याचा आपण अंतर्मुख होऊन विचार केला तर मनोभावे बेंबीच्या देठापासून आणि ह्रदयाच्या तळापासून सेवा करणारा त्याच्या उपास्य दैवतापासून कितीही दूर जरी असला तरी तो उपास्य दैवताजवळच असतो थोडक्यात म्हणजे निवृत्ती स्वरुप विरक्त बाळाप्पा देहाने जरी श्री स्वामी महाराजांपासून दूर गेल्यासारखा दिसत असला तरी मनाने मात्र तो सदैव श्री स्वामी महाराजांपाशीच होता म्हणूनच तर जो देवापासून विभक्त नसतो त्यास भक्त म्हणतात असा हा बाळाप्पा श्री स्वामी समर्थांचा निःस्सीम भक्त होता या लीला भागातून आपण आसक्त सुंदराबाई व्हायचे की विरक्त बाळाप्पा व्हायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या