एक दिवस महाराज बाळाप्पास म्हणाले जे असेल ते द्या आणि चालते व्हा बाळाप्पाने त्याच्या कानातील पंचवीस रुपयाची भिकबाळी व घोंगडी धोतर तांब्या पंचपात्री वगैरेचे गाठोडे बांधून ते श्री समर्थांपुढे ठेवले आणि श्री स्वामीस साष्टांग नमस्कार घातला बाईने गाठोडे लगेच घरात नेऊन ठेवले आणि ती म्हणाली महाराज बाळाप्पास अंथरण्यास कांबळे तरी असू द्या महाराज तिला म्हणाले तुझे कांबळे तो कशास घेईल त्यास शाल जोडी मिळेल काही दिवसांनी बाईचे पाय बरे झाले तरी तिची पहिली खोड काही गेली नाही.


अर्थ भावार्थ मथितार्थ 

बाळाप्पा कर्नाटक प्रांतातून घरदार बायको पोरं चांगली सराफी आणि सावकारी व्यवसाय सोडून सदगुरुंच्या शोधार्थ अक्कलकोटी आला होत्याची ही विरक्ती त्याच्या चित्तातून आलेली होती कारण मानवी चित्तच सर्व कर्माच्या अनुभवाचा त्याच्या संस्काराचा आणि स्मरणाचा साठा करते अपरिग्रह हा विरक्तीचा मूलभूत पाया आहे अपरिग्रहा पाठोपाठ जीवाच्या आचार विचारात सत्य दया अहिंसा क्षमाशिलत्व आर्जव प्रीती प्रासाद माधुर्य आणि मार्दव यावे लागते बाळाप्पाच्या व्यक्तिमत्त्वात आणि वृत्तीत हे सर्व गुण होते पण अपरिग्रह (म्हणजे संग्रहाचा हव्यास नसणे) हे बाळाप्पास अद्यापही पूर्णपणे साधलेले नव्हते त्याच्या कानात त्या काळात प्रतिष्ठित मानली गेलेली भिकबाळी होती म्हणजे आपण कुणीतरी वेगळे प्रतिष्ठित आहोत अशी किंचितशी का होईना भावना बाळाप्पात होतीच घोंगडे धोतर हे सर्वच्यासर्व गुरुचरणी अर्पण करण्याचा आदेश श्री स्वामींनी त्यास देऊन पूर्ण विरक्तीने उपासना चालू ठेवा हे सांगण्यासाठी ते म्हणाले जे असेल ते द्या आणि चालते व्हा श्री स्वामी महाराजांच्या या बोलण्याचा मथितार्थ बाळाप्पास कळला होता त्याने एका क्षणाचाही विचार न करता बिनतक्रार गुरुआदेश शिरसावंद्य मानून कानातील भिकबाळीसह जवळ असलेल्या सर्वच्या सर्व वस्तू श्री स्वामी चरणी अर्पण केल्या परंतु षडरिपूलिप्त सुंदराबाईच्या देहबुद्धीला श्री स्वामी वचनाचा मथितार्थ कळला नाही कसा कळावा सदैव आकंठ लोभात बुडालेल्या सुंदराबाईने अगदी निर्लज्जपणे बाळाप्पाने श्री स्वामींपुढे ठेवलेले ते गाठोडे उचलले आणि घरात नेऊन ठेवले वरती मानभावीपणे बाळाप्पावर आपण उपकार करीत आहोत अशा आविर्भावात महाराज बाळाप्पास अंथरण्यास एखादे कांबळे तरी असू द्या असे तिने श्री स्वामीस सांगितले महाराजांनी तिच्या ह्या अविवेकी उथळ बोलण्याकडे साफ दुर्लक्ष करुन सांगितले तुझे कांबळे तो कशास घेईल त्यास शालजोडी मिळेल अर्थात तिला श्री स्वामींचे हे बोलणेही कळले नाही मोह मायेच्या आहारी गेलेल्यांचा विवेक पूर्णतः अंध बहिरा बधिर झालेला असतो अशा सुंदराबाईस श्री स्वामींची ही आशयपूर्ण वाणी कशी समजावी कांबळ्यापेक्षा शाल शाल महत्त्वाची मौल्यवान किंमती असते ते तिला कसे उमजावे पण आपण मात्र यातला गर्भित अर्थ समजून घ्यावा आणि शालीचे महत्त्व जाणावे हा इथला अर्थबोध आहे.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या