पुण्याच्या पांडुरंग बापूजी जाधवावर ईश्वरी क्षोभ होऊन तीन महिन्यात त्यांची चार मुले एका पाठोपाठ एक वारली त्यांना संतान नसल्यामुळे ते अतिशय दुःखी होते त्यांची पत्नी भागूबाई भाविक होती तिच्या ऐकण्यात श्री स्वामी समर्थांचे चरित्र आले तिची श्री स्वामी चरणी भक्ती जडली ती सर्व काळ श्री स्वामी समर्थांचे ध्यान आणि नामस्मरण करु लागली तिने श्री स्वामी समर्थांची एक तसबीर मिळवून ती त्यांची नित्य पूजा करु लागली तिच्या ध्यान धारणेत कोणी व्यत्यय आणला तर तिला मोठे दुःख होत असे एके दिवशी श्री स्वामी महाराजांनी तिच्या स्वप्नात येऊन तिला विचारले मी तुला मुलगा दिला तर तू मला काय देशील त्यावर तिने उत्तर दिले मुलगा महाराजांच्या पायावर घालून त्याला ब्रह्मचारी करीन दोनशे ब्राम्हण अक्कलकोटात जेऊ घालीन या स्वप्न दृष्टांतानंतर बाई काही दिवसांनी गरोदर राहिली पण सातव्या महिन्यानंतर एक दिवस बाई अस्पर्श झाली त्यामुळे तिच्या मनात भीती निर्माण झाली तिने श्री स्वामींची कळवळून प्रार्थना केली की महाराज मला दगा देऊ नका मजकडे चांगले लक्ष द्या माझे गणगोत आई बाप आपणच आहात त्याच रात्री काही घाबरू नको असे श्री स्वामींनी तिला दृष्टांतात सांगितले यापुढे नऊ महिने झाल्यावर चैत्र शु.१२ शके १७७६ (इ.स.१८९४) रोजी ती बाळंत होऊन तिला पुत्र झाला काही दिवसांनी तिला दृष्टांत झाला की श्री स्वामी महाराज केळीच्या मखरात बसलेले असून दोन सेवेकरी त्यांची सेवा करीत आहेत तेव्हा श्री स्वामी महाराज बाईस म्हणाले मुलगा झाला आता आम्हास सांगितल्याप्रमाणे दिले पाहिजे असा दृष्टांत झाला.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

श्री स्वामी समर्थांनी इ.स.१८७८ साली अक्कलकोट येथे समाधी घेतल्यानंतर ही लीला घडली आहे सगुण स्वरुपातील श्री स्वामी समर्थ जरी समाधिस्थ झालेले असले तरी त्यांची अनन्य भावाने भक्ती करणाऱ्यास ते स्वप्न दृष्टांत देऊन सद्यःस्थितीतही मार्गदर्शन व साह्य करतात कुणाच्याही माध्यमातून का होईना हस्ते परहस्ते मदत करतात संकट पीडा दुःखाची तीव्रता कमी करतात त्यापैकीच एक पांडुरंग बापूजी जाधवाचे उदाहरण आहे अशी शेकडो नव्हे तर हजारो उदाहरणे आहेत त्या दोघा पती पत्नीवर एक दोन महिन्याच्या कालावधीत चार मुलांच्या मृत्यूचा आघात झाला परंतु यात समाधानाची गोष्ट म्हणजे त्याची पत्नी भागूबाई भाविक होती तिच्या अत्यंतिक भाविकपणामुळे व तिला श्री स्वामी समर्थ या अवतारी विभूतीचे महत्त्व त्यांच्या अनेक लीला तिच्या ऐकण्यात आल्या तेव्हा पुणे वैभव या साप्ताहिकातून श्री स्वामी चरित्र क्रमश प्रसिद्ध होत होते तिने त्यावेळी श्री स्वामींची तसबीर खटपट करुन मिळविली ती त्या तसबिरीसमोर बसून श्री स्वामींचे सदैव ध्यान आणि नामस्मरण करु लागली याचेच फळ म्हणून श्री स्वामींनी तिला स्वप्न दृष्टांत देऊन मुलगा देण्याचे अभिवचन दिले तू मला काय देशील असे श्री स्वामींनी तिला विचारताच त्या साध्या भोळ्या भाविक भागूबाईने दिलेले उत्तरही मोठे प्रांजळ आहे ती म्हणाली मुलगा झाल्यावर महाराजांच्या पायावर घालून त्याला ब्रह्यचारी करीन दोनशे ब्राम्हण अक्कलकोटात जेवू घालीन तिच्या या प्रांजळ उत्तरास श्री स्वामींनी तथास्तु म्हणून तिच्या भक्तीला एक प्रकारे मान्यता दिली श्री स्वामी समर्थांच्या कृपाशीर्वादाने सातव्या महिन्यात आलेले संकट पार होऊन ती बाळंत झाली तिला मुलगा झाला श्री स्वामींनी त्यांचे काम केले आता नवस फेडण्याची मुलगा झाला आता आम्हाला सांगितल्या प्रमाणे दिले पाहिजे असा दृष्टांत झाला म्हणजेच श्री स्वामींस दिलेल्या वचनाला जागण्याची जबाबदारी त्या दोघा पती पत्नीची होती भागूबाईस स्वप्न दृष्टांतातून श्री स्वामींनी निर्देशित केले की आम्ही समाधिस्थ झालो आहोत समाधी स्थानी यावे केळीच्या मखरात सिंहासनावर बसलेले श्री स्वामी समर्थ दोन्ही बाजूस सेवा करीत असलेले दोन सेवेकरी हे स्वप्न म्हणजे प्रत्यक्ष श्री स्वामी महाराजांच्या समाधी सोहळ्याचाच तो दृष्य प्रसंग होता पुढे ते दोघेही दिल्या वचनाला जागले श्री स्वामी समर्थ समाधिस्थ झाल्यानंतरही त्यांच्या भक्तांचा कसा सांभाळ करतात योगक्षेम चालवतात याचा बोध देणारी ही रसाळ लीला आहे.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या