मुंबईच्या गव्हर्नरांनी संस्थांच्या कामासंबंधी अक्कलकोटच्या मालोजी राजास सोलापूरला बोलावले होते तेव्हा कारभारी चिंतोपंत टोळ यांनी राजास सुचविले की गव्हर्नरकडे राजकीय कामासाठी जाण्यापूर्वी चोळाप्पाच्या घरी आलेल्या एका साधूस भेटून त्यांचे दर्शन आणि आशीर्वाद घेऊन मग पुढे सोलापूरास जाऊ टोळांच्या सूचनेनुसार मालोजीराजे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास गेले श्री स्वामींची उग्र मुद्रा पाहून राजास श्री स्वामींच्या पुढे जाण्याचे धाडस होईना अरे इकडे ये म्हणून श्री स्वामींनी राजास हाक मारली आणि राजाच्या उजव्या हातात तलवार व डाव्या हातात पिकदाणी दिली श्री स्वामींच्या या कृतीचा मालोजी राजास असा अनुभव आला की गव्हर्नरकडून मानाची तोफांची सरबत्ती व इतमाम मिळाले नाही त्यामुळे राजास वाईट वाटले मात्र हत्यारे बाळगण्याची परवानगी मिळाली .


अर्थ - भावार्थ - मथितार्थ

श्री स्वामी समर्थांनी मालोजी राजास पिकदाणी देऊन अपमानाची अगोदरच कल्पना दिली होती घडलेही तसेच संस्थानाचा राजा म्हणून मानाची तोफेची सलामी व इतर मानमरातब मालोजीराजास मिळावयास हवा होता पण तो मिळाला नाही हे पिकदाणीवरुन बोधित होते हत्यारे बाळगण्यास मात्र परवानगी मिळाली हे तलवार दिल्यावरुन बोधित होते श्री स्वामींनी मालोजी राजास अनुकूलता आणि प्रतिकूलता अगोदरच सूचित केली होती पुढे श्री स्वामींनी अक्कलकोट संस्थानाचे व तेथील प्रजेचे राजाकरवी चांगले रक्षणही केले सद्गुरु नेहमीच शुभ अशुभ संकेत देत असतात ते आपण ओळखले पाहिजे जाणत्या उपासकाने याबाबत मनन चिंतन करुन योग्य तो बोध घ्यावयास हवा.

श्री स्वामी समर्थ 


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या