चोळाप्पाचा मुलगा कृष्णाप्पाची मौंज झाल्यावर पंधरा दिवसांनी त्यास महामारीचा (पटकी रोगाचा ) उपद्रव होऊन त्यात त्याचा अंत झाला घरची सर्व माणसे आक्रोश करु लागली इतक्यात श्री स्वामींची स्वारी तेथे येऊन म्हणाली मूर्ख आहात रडता काय याचे शुभ लग्न व्हावयाचे आहे असे म्हणून श्री स्वामी महाराज कृष्णाप्पाजवळ जाऊन त्यास हाक मारु लागले अरे नीळकंठा ऊठ ऊठ आमच्याबरोबर दोन शब्द बोल श्री स्वामी समर्थांचे हे अमृततुल्य वचन ऐकताच कृष्णाप्पाची हालचाल सुरू झाली त्याच्या सर्वांगात उष्णता येऊन तो डोळे उघडून पाहू लागला व थोड्याच वेळात उठून बसला .


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

कृष्णाप्पाची नुकतीच मौंज झाली होती याचा अर्थ श्रीगुरुंचा अनुग्रह त्याला नुकताच प्राप्त झाला होता म्हणजे तो गुरुसेवेत नुकताच सामील झाला होता असा अर्थ निघतो पण त्यात अद्यापही स्थिरावला नव्हता त्याची गुरुसेवेची ती सुरुवात होती चोळाप्पाचा श्री स्वामींशी आंतरिक भक्त सखा म्हणून असलेला संबंध कृष्णाप्पाची मौंज होऊन त्याचा गुरुसेवेत नुकताच झालेला प्रवेश तो मृत होताच तत्क्षणी श्री स्वामींचे तेथे आगमन शक्तिपाताचा त्यांनी केलेला हा अपवादात्मक प्रयोग (पूर्व पुण्याई पूर्व संचित कृष्णाप्पाचे ) त्यामुळेच कृष्णाप्पास जीवदान मिळाले अर्थात अशा घटना क्वचितच घडत असतात असे प्रयोग अपवादात्मकच असतात निसर्गचक्रातील जन्म मृत्यूत परमेश्वर सहसा ढवळाढवळ करीत नाहीत अभिमन्यूच्या मृत्यूच्या वेळीही श्रीकृष्ण प्रत्यक्ष तेथे असूनही त्यांनी हा प्रयोग केला नाही श्री स्वामी समर्थांचे अफाट सामर्थ्य बोधित करणारी ही एक आगळी वेगळी लीला आहे .

श्री स्वामी समर्थ 


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या