अक्कलकोटात शेषाचार्य अग्निहोत्री म्हणून एक अतिशय सात्त्विक ब्राम्हण होता भिक्षा मागून तो त्याची व त्याच्या कुटुंबियांची उपजीविका करीत असे त्यांचे श्री स्वामी समर्थांप्रती व श्री स्वामी समर्थांचे त्यांच्याप्रती फार प्रेम होते तो श्री स्वामींच्या दर्शनास गेला म्हणजे श्री स्वामी महाराज त्यांचा नमस्कार घेण्यासाठी प्रेमाने पाय पुढे आणि शेषाचार्यही मोठ्या भावभक्तीने श्री स्वामी समर्थांच्या चरणांचे दर्शन घेत त्याने पुढे केलेल्या तपकिरीच्या डबीतून श्री स्वामी चिमूटभर तपकीर घेऊन ती ओढीत असा त्यांचा नित्यक्रम सतत चाले जर एखादे दिवशी श्री स्वामी रागावले तर त्यांच्या समोर जाण्याची कुणाचीही हिंमत होत नसे पण शेषाचार्य मात्र श्री स्वामींपुढे जाऊन बेलाशक त्यांचे दर्शन घेत असत श्री स्वामी समर्थांपुढे दररोज पेढे बर्फीची ताटेच्या ताटे लोक आणून ठेवित मात्र ते सर्व पेढे बर्फी लहान लहान मुलास आलेल्या दर्शनार्थांस कुत्र्यास बैलास खाऊ घालीत वाटून टाकीत पण शेषाचार्य अग्निहोत्रीस मात्र श्री स्वामींनी कधीही पेढ्याचा तुकडासुध्दा दिला नाही तेव्हा त्याच्या मनात येई श्री स्वामी समर्थ महाराज आलेल्या सर्वांस प्रसाद देतात आणि मला मात्र कधीही प्रसाद देत नाहीत याला काय म्हणावे श्री स्वामी महाराजांचे प्रेम मजवर सुकेच आहे एक दिवस मात्र मिठाईची बरीच ताटे श्री स्वामींपुढे आलेली पाहून महाराज मला प्रसाद द्या असे म्हणून शेषाचार्यांनी प्रसादासाठी हात पुढे केला श्री स्वामी काहीच बोलले नाहीत किंवा एक पेढादेखील त्यास दिला नाही तेव्हा शेषाचार्य अग्निहोत्री बुवास फारच वाईट वाटले.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

लीलाकथेतील या भागावरुन शेषाचार्य अग्निहोत्री परमभाग्यशाली आणि पुण्वान आहे कारण प्रत्यक्ष भगवान परब्रम्ह श्री स्वामी समर्थांचे प्रेम त्याला लाभले होते त्या दोघांच्या प्रेमसंबंधाचे वर्णन या लीलेतील कथा भागामध्ये वर आले आहेच श्री स्वामींची खासियत अशी होती की ज्याला जवळ करायचे आहे त्याला ते कधीही प्रसाद देत नसत आणि ज्याच्या उध्दाराची वेळ जवळ आली आहे त्यालाच ते जवळ करीत बाकीच्यांना मात्र ते प्रसाद देऊन वाटेस लावीत शेषाचार्य हा असाच एक भाग्यवंत होता की ज्याला श्री स्वामींकडून प्रसाद मिळत नव्हता आपल्यातील शेकडा नव्याण्णव टक्के लोक हे प्रापंचिक असतात ते त्यांची गार्हाणी दुःख पीडा आदींचे निराकरण करण्यासाठी स्वतःच्या अन्य कामना पूर्ण करुन घेण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी देवाकडे येत असतात देवाकडे काय मागावे हेच काम क्रोध लोभ मोह मद मत्सर या षडरिपू ग्रस्ततेमुळे कळत नाही देवापुढेही त्यांना निर्लेप निर्मोही निःस्पृह होता येत नाही हीच उपासनेतील मोठी अडचण आहे शेषाचार्यांची आध्यात्मिक तयारी तशी अजून अपुरीच होती श्री स्वामींना ती त्यांच्याकडून करुन घ्यायची होती म्हणून श्री स्वामींनी त्यास प्रसाद न देण्याची कृती केली याचे त्यास नवल आणि विषादपूर्ण वाटे महाराजांचे प्रेम मजवर सुकेच आहे हा त्यांचा अज्ञानमूलक भ्रम होता त्याला वाटणाऱ्या विषादाचे रुपांतर शूद्र वासनेत झाल्याचे त्यासच कळले नव्हते श्री स्वामींच्या कृपा लोभापेक्षा पेढ्या बर्फीचा लोभ त्याला अधिक वाटू लागला श्री स्वामी समर्थ हे शेषाचार्यांची ती मनोवृत्ती न्याहाळीत होते पण बोलत मात्र काहीच नव्हते कारण त्याच्या मनात लोभाचे भोवरे फिरत होते.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या